आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम केलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे. पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान पटकावलं होतं. सौरभच्या या कामगिरीसाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने ५० लाखांचं इनाम घोषित केलं आहे. दुसरीकडे ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्य पदकाची कमाई केली. दरम्यान ५० मी. फ्रिस्टाईल जलतरण प्रकारात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने वीरधवलंचं या अंतिम स्पर्धेतलं पदक हुकलं आहे. पात्रता फेरीत त्याने केलेल्या कामगिरीवरुन भारताला पदकची आशा निर्माण झाली होती. मात्र त्याच्या पदरात अखेर अपयशच पडलं. कुस्तीत दिव्या काकरानने रेपिचाच प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. तर Sepak Takraw क्रीडा प्रकारात भारतीय संघाने सांघिक कांस्यपदकाची कमाई केली आहे. रोविंगमध्ये भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे यामधूनही भारताला पदकाची आशा आहे. तसेच ६८ किलो वजनी गट फ्रिस्टाईल प्रकारात भारताच्या दिव्या काकरानला कांस्यपदक मिळाले. चीनी तैपेईच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा तिने पराभव केला.