भारताचा कर्णधार अजय रेड्डीचा अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने दृष्टीहिन क्रिकेट विश्वचषकात बांगलादेशवर १० गडी राखून मात केली. दृष्टीहिन खेळाडूंसाठीचा पाचवा विश्वचषक सध्या दुबई येथे खेळवण्यात येतो आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय स्विकारलेल्या बांगलादेशने ४० षटकांमध्ये ८ गड्यांच्या मोबदल्यात २२६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने बांगलादेशने दिलेलं आव्हान अवघ्या १८.४ षटकांमध्ये पूर्ण केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा कर्णधार अजय रेड्डीने ६० चेंडुंमध्ये १०१ धावा पटकावल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकारांचा समावेश होता. त्याला दुसऱ्या बाजूने सुनील रमेशने ५७ चेंडुंमध्ये १०५ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. रमेशच्या शतकी खेळीत १७ चौकारांचा समावेश होता. कर्णधार अजय रेड्डीने ८ षटकांत ४ गडीही टिपले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blinds cricket world cup dubai 2018 india defeat bangladesh by 10 wickets
First published on: 14-01-2018 at 09:19 IST