चेन्नई : भारतीय संघातील खेळाडूंना सातत्याने होणाऱ्या दुखापतींची चिंता असली, तरी खेळाडू विश्रांती मिळावी यासाठी ‘आयपीएल’च्या सामन्यांना मुकण्याची शक्यता कमीच आहे, असे वक्तव्य कर्णधार रोहित शर्माने केले.

भारताला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेत भारताला जसप्रीत बुमरा आणि श्रेयस अय्यर यांसारख्या प्रमुख खेळाडूंची उणीव जाणवली. या दोघांसह प्रसिध कृष्णा आणि दीपक चहर यांना अलीकडच्या काळात पाठीच्या दुखापतीने सतावले आहे. यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने त्यापूर्वी खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. परंतु भारतीय खेळाडू आता ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘आयपीएल’मध्ये खेळणार आहेत. या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना विश्रांती द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय पूर्णपणे त्या त्या संघांचा, संघ मालकांचा आणि खेळाडूंचा असल्याचे रोहितने स्पष्ट केले. ‘‘खेळाडूंना सातत्याने होणाऱ्या दुखापतींची आम्हाला नक्कीच चिंता आहे. आम्हाला प्रमुख खेळाडूंची उणीव जाणवली. या खेळाडूंचे अंतिम ११ जणांमधील स्थान निश्चित होते. तुम्ही जेव्हा सातत्याने क्रिकेट खेळता, तेव्हा दुखापती होण्याची शक्यता वाढते. परंतु दुखापतींवर कोणाचेही नियंत्रण नाही,’’ असे चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर रोहित म्हणाला.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’