मेलबर्न : सारा पैशाचा खेळ असून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेणारे संघ अशाच परिस्थितीमध्ये भारतात खेळण्यास मात्र होकार देतात, असे विधान पाकिस्तानमध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाने केले. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांनी नुकताच पाकिस्तान दौरा रद्द केला.

‘‘खेळाडू आणि क्रिकेट मंडळांना पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेणे सोपे वाटते. मात्र, भारतात अशीच परिस्थिती असली तरी तिथे खेळण्यास कोणीही नकार देणार नाही,’’ असे ख्वाजा म्हणाला. ‘‘सारा पैशाचा खेळ आहे. आर्थिक गणितांना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सर्वांनाच माहित आहे. पाकिस्तानमध्ये अनेक स्पर्धा झाल्या असून तिथे क्रिकेट खेळणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे,’’ असेही ख्वाजाने सांगितले.