मेलबर्न : महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सर्वात प्रभावशाली आहेत, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने म्हटले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेन्टी-२० विश्वचषकाची सलामीची लढत शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) खेळवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने महिलांचे क्रिकेट एक वेगळी उंची गाठणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलिया हा यजमान देश आहे, याचा मला अभिमान आहे. विश्वचषकाची सलामीची लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन सर्वोत्तम संघांमध्ये सिडनी येथे होत आहे ही आणखी एक चांगली बाब आहे,’’ असेही ब्रेट ली याने म्हटले.

भारताच्या महिला संघाचेही ब्रेट ली याने कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा या सर्वोत्तम फलंदाज आहेत. भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रत्येकाचे लक्ष असेल यात शंका नाही.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India australia most impressive teams in women s t20 world cup says brett lee zws
First published on: 20-02-2020 at 03:30 IST