नवी मुंबई : भारतीय महिला संघाला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी झालेल्या सलामीच्या लढतीत इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले. यजमान भारताला या सामन्यात गोलच्या बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा करून घेण्यात त्यांना अपयश आले.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीला इराणच्या संघाने आक्रमक खेळ केला. त्यांना गोल करण्यासाठी दोन उत्तम संधी मिळाल्या, ज्यापैकी एक फटका क्रॉसबारलाही लागला. यानंतर मात्र भारताने दमदार पुनरागमन करताना सकारात्मक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी इराणची बचाव फळी आणि गोलरक्षक यांच्यावर दडपण टाकले. त्यांनी छोटे-छोटे पास करतानाच चांगले क्रॉसही केले. ७६व्या मिनिटाला राखीव फळीतील डांगमे ग्रेसला गोल करण्याची सर्वोत्तम संधी मिळाली. मात्र, तिने हेडरमार्फत मारलेला फटका इराणची गोलरक्षक झोहरे कुंडेइने अप्रतिमरित्या अडवला. त्यामुळे भारताला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
MS Dhoni 300 Dismissals in T20
DC vs CSK : महेंद्रसिंग धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

अ-गटात समाविष्ट असलेल्या भारतीय संघाचा दुसरा साखळी सामना रविवारी चायनीज तैपेइविरुद्ध रंगणार आहे.