पुणे : राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघुसिंचन प्रकल्पातून दरवर्षी १६५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सरकारच्या जलसंपदा विभागाने तयार केलेल्या ‘पाणी लेखापरीक्षण अहवाला’नुसार पुण्याला नऊ वर्षे, तर मुंबईला तीन वर्षे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकेल, एवढ्या पाण्याची वाफ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाण्याद्वारे ८.२५ लाख हेक्टरवरील शेतीचे सिंचन होऊ शकले असते.

हेही वाचा >>> बापू नायर टोळीतील गुंडाने कारागृहातून खंडणी वसूल केल्याचा प्रकार उघड, कोल्हापूर कारागृहातून १४ मोबाइल क्रमांकाचा वापर

Nashik, water supply, tankers, villages, North Maharashtra, heavy rains, flooding, dams, rainfall, water storage, drinking water, Jalgaon, Dhule, Nandurbar, Malegaon, Manmad, Virchak Dam, marathi news,
पावसाळ्यातही उत्तर महाराष्ट्रात २२४ टँकरव्दारे पाणी पुरवठा; ७४९ गाव, वाड्यांची तहान भागविण्याचे प्रयत्न
koyna dam marathi news
Koyna Dam: कोयनेचे दरवाजे दीड फुटांवर, पाणलोटात १२.३० इंच पाऊस; सांगली, कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर
sangli flood marathi news
Sangli Rain News: महापूर सांगलीच्या वेशीवर, ४० कुटुंबांचे स्थलांतर, अलमट्टीचा विसर्ग ३ लाखावर
Koyna dam, Satara,Water reservoirs,
सातारा : कोयना धरण निम्म्यावर; जलसाठे भक्कमस्थितीत
Satara, Koyna, rain, dam, Koyna,
सातारा : कोयना पाणलोटात मुसळधार; धरण निम्म्याने भरण्याच्या मार्गावर
CIDCO, CIDCO Initiates Construction of Maharashtra Bhavan, Maharashtra Bhavan Construction in vashi, Vashi Railway Station, Navi Mumbai, Eknath shinde,
पनवेल : महाराष्ट्र भवनासाठी सिडको १२१ कोटी रुपये खर्च करणार
rain, Coastal, Western Ghats,
किनारपट्टी, पश्चिम घाट परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाचा जोर
Mahabaleshwar 50 inches of rainfall
महाबळेश्वर येथे हंगामातील ५० इंच पावसाची नोंद, दाट धुके आणि वर्षा पर्यटनाची पर्यटकांना भुरळ

राजस्थान आणि महाराष्ट्रातील बाष्पीभवनाचा दर सर्वाधिक आहे. राज्याच्या पाणी लेखापरीक्षण अहवाल २०२१-२२ नुसार मोठे, लहान व मध्यम प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता सुमारे १,४९६ अब्ज घनफूट (टीएमसी) असून त्यापैकी सुमारे ११ टक्के (१६५ टीएमसी) पाण्याचे एका वर्षात बाष्पीभवन होते. विदर्भात २.५ ते ३ मीटर, मराठवाड्यात २ ते २.७५ मीटर, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात १.५ ते १.७५ मीटर तर कोकणात ०.८० मीटर पाण्याचे दरवर्षी बाष्पीभवन होते. केवळ तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो, हा समजही चुकीचा आहे. तापमानाबरोबरच क्षेत्रफळ (पाणी पसारा), वातावरणातील बाष्पाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि पाण्याची खोली यांचाही परिणाम होतो. त्यातही ८० टक्के बाष्पीभवनासाठी वायुप्रवाह जबाबदार असतो. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा दर जास्त असतो. कोकणात बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. धरणनिहाय आणि हंगामनिहाय बाष्पीभवनाचा वेग भिन्न असल्याचे जलसंपदा विभागाचे पुण्यातील मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांनी स्पष्ट केले.

एका वर्षात श्रीशैलम प्रकल्पातील ३३ टीएमसी, नागार्जुन सागरमधील १६ टीएमसी आणि उजनी धरणातील २२ टीएमी पाण्याचे बाष्पीभवन होते. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढत आहे. – सतीश खाडे, पाणी आणि पर्यावरण अभ्यासक