अवश्य वाचा – IPL च्या नवीन हंगामाची तयारी सुरु, नवव्या संघासाठी अदानी ग्रुप शर्यतीत
१९ सप्टेंबरपासून युएईत तेराव्या हंगामाला सुरुवात झाली. शारजा, दुबई आणि अबु धाबी अशा ३ मैदानावंर हे सामने खेळवण्यात आले. मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने युएई क्रिकेट बोर्डाला १४ लाख अमेरिकन डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम) दिले आहेत. १० नोव्हेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेचच पुढच्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. पुढचा हंगाम भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आयपीएल २०२१ आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी युएई क्रिकेट बोर्डासोबत करार केला आहे.
अवश्य वाचा – केन विल्यमसन SRH ची साथ सोडणार?? कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणतो…