इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया कसोटी सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडने २६६ धावांनी धूळ चारून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंड गोलंदाजांसमोर अक्षरश: गुडघे टेकले. दुसऱया डावात भक्कम आघाडी मिळविलेल्या इंग्लंड संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी ४४५ आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे ढासळली. अजिंक्य रहाणे शिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही गाठता आले नाही आणि दुसऱया डावात भारतीय संघ १७८ धावांवर गारद झाला. अष्टपैलू मोईन अली इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मोईनने सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताच्या सहा फलंदाजांना तंबूत धाडले आणि संघाला ‘विजय श्री’ मिवळून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lndia lost third test against england
First published on: 31-07-2014 at 05:50 IST