भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा आणि यांनी न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. रोहितने कर्णधारपद आणि राहुल द्रविडने प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर एकत्र येऊन माध्यमांशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ होती. यादरम्यान रोहित म्हणाला की, विराट कोहलीची भूमिका पूर्वीसारखीच राहील. येत्या सामन्यांमध्ये त्याच्या आगमनाने संघ अधिक मजबूत होईल.

आतापर्यंत संघाशी झालेल्या संभाषणाबाबत राहुल द्रविड म्हणाला की, भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये व्यस्त होती, त्यामुळे कमी संवाद झाला. मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. अष्टपैलू खेळाडूच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला की, संघ फक्त एक किंवा दोन खेळाडूंवर लक्ष केंद्रित करत नाही. आम्हाला एक यशस्वी संघ बनण्यास काय मदत होईल यावर आमचे लक्ष आहे.

टीम इंडियाच्या व्हिजनबद्दल द्रविड म्हणाला की, “आमच्याकडे कोणतीही प्राथमिकता नाही. आमच्यासाठी तिन्ही फॉरमॅट महत्त्वाचे आहेत. आम्हाला हे देखील लक्षात घ्यावे लागेल की पुढे अनेक आयसीसी स्पर्धा आहेत. हे लक्षात घेऊन तयारी करावी लागेल. माझी दृष्टी अशी आहे की आपण स्वतःला एकंदरीत सुधारले पाहिजे. त्यासाठी सर्व फॉरमॅटची काळजी घेतली जाईल.”

खेळाडूंच्या वर्कलोडवर द्रविड म्हणाला की वर्कफ्लो मॅनेजमेंट हा एक आवश्यक भाग आहे. कामाचा बोजा सांभाळावा लागेल. फुटबॉल खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटचीही गरज असते. आम्हाला संघाचा समतोल साधावा लागेल. त्याचबरोबर मोठ्या टूर्नामेंटचीही काळजी घ्यावी लागेल. तर रोहित शर्मानेही याबाबत आपले मत मांडले. “थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. खेळाडू बराच काळ खेळत आहेत, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे,” असे रोहित शर्मा म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही आमच्या खेळाडूंना निर्भयपणे खेळण्यास सांगू. टी-२० फॉरमॅटमध्ये खेळाडूने कशाचीही भीती बाळगू नये हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी मैदानात जाऊन निर्भयपणे खेळले पाहिजे. ते यशस्वी ठरले तर हरकत नाही. यामध्ये माझी आणि प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे कारण त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा अशी आमची इच्छा आहे. ते या संघात सुरक्षित आहे हे आपण त्याला सांगायला हवे,” असे रोहित शर्माने म्हटले.