Shoaib Akhtar on Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच एकदिवसीय विश्वचषक २०२३साठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार असून त्याचे यजमानपद हे टीम इंडियाला मिळाले आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक २०२३ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात स्थान मिळवण्यात यश आले, तर काही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले. टीम इंडियाच्या या संघ निवडीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीका केली आहे.

बीसीसीआयने ज्या काही खेळाडूंना संघातून वगळले आहे या खेळाडूंपैकी एक लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आहे, जो विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा नियमित सदस्य होता. मात्र, अलीकडच्या काळात खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. चहलच्या हकालपट्टीवर शोएब अख्तर संतापला. म्हणाला, “अष्टपैलू खेळाडूंद्वारे टीम इंडिया त्यांची फलंदाजी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. हा अतिशय चुकीचा विचार असून यामुळे ते स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे.” शोएबने भारताच्या धोरणावर टीका केली आहे.

Virat Kohli Statement on His Retirement Plans
“…तर तुम्ही मला बराच काळ पाहू शकणार नाही”, विराट कोहलीचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य
Asaduddin Owaisi interview
“हिजाब घातलेली महिला एकेदिवशी भारताची पंतप्रधान असेल”, असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?
Narendra Modi Himself Said BJP Can Not Make INDIA Strong In a Video
नरेंद्र मोदीच म्हणाले, भाजपा भारताला मजबूत करू शकत नाही?, १४ सेकंदांच्या Video मुळे खळबळ, तेव्हा नेमकं घडलं काय?
finch bishop reviews indian squad t20 world cup
वेगवान गोलंदाजाची कमतरता! ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या संघाबाबत फिंच, बिशप यांचे मत
Indian Team Announced for ICC T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 : रोहितची सेना ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकणार का? जाणून घ्या भारताची ताकद आणि कमकुवतपणा
Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
Shashi Tharoor's response to Harbhajan Singh tweet
त्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही: हरभजनच्या ‘सॅमसनला पुढचा टी-२० कर्णधार बनवायला हवा’ या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया
Shubman Gill Future India Captain, Suresh Raina Claims
IPL 2024 : हार्दिक किंवा पंत नव्हे, तर ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू असू शकतो भारताचा भावी कर्णधार, ‘मिस्टर आयपीएल’चे वक्तव्य

टीम इंडियाला एका गोलंदाजाची कमतरता आहे – शोएब अख्तर

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शोएब अख्तर म्हणाला, “भारताने युजवेंद्र चहलची निवड का केली नाही, हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. जेव्हा भारतीय संघ अडचणीत येईल १५० किंवा २०० धावांवर बाद होईल तेव्हा, फलंदाजांना नाही तर गोलंदाजांवर अधिक जबाबदारी येते. तुम्ही तुमची बॅटिंग लाइनअप अजून कुठपर्यंत खेचणार आहात? जर पहिले पाच फलंदाज काहीही करू शकत नसतील तर ७ किंवा ८ क्रमांकाचे काय करणार? त्यामुळे, माझ्यामते तुम्ही कमी गोलंदाजासोबत खेळत आहात.”

शोएब अख्तर पुढे म्हणाला की, “भारताने त्यांच्या गोलंदाजीत वैविध्य आणण्यासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड करायला हवी होती. मला वाटते की अर्शदीप संघात असावा कारण, दबावाखाली जेव्हा तुम्ही पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध खेळत असता तेव्हा तुम्हाला डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाची गरज भासते. त्याने २०२२ टी२० वर्ल्डकपमध्ये शानदार गोलंदाजी केली होती.”

अर्शदीप सिंगला वन डेत अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही

अर्शदीप जुलै २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून टी२०मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने या फॉरमॅटमध्ये ३३ सामन्यांत १८.९८च्या सरासरीने ५० विकेट्स घेतले आहेत. मात्र, वन डेमध्ये तीन सामने खेळूनही एकही विकेट घेता आलेली नाही. दुसरीकडे, युजवेंद्र चहलने २०२१ पासून एकदिवसीय फॉरमॅटमध्ये १८ सामन्यांत २९ विकेट्स घेतले आहेत.

हेही वाचा: IND vs PAK: विश्वचषकाआधी शोएब-हरभजनमध्ये जुंपली; अख्तर म्हणाला, “वर्ल्ड कपमधून आम्ही टीम इंडियाला…”

भारतीय संघाची प्लेईंग ११ स्थिर नाही

शोएब अख्तर म्हणाला की, “भारतीय संघाची प्लेईंग ११ गेल्या दोन वर्षांपासून स्थिर नाही, हे माझ्यासाठी खूप विचित्र आहे. कारण, तुम्हाला माहीत नाही की कोण कोणत्या नंबरवर खेळणार आहे. त्यात जर संघात वरिष्ठ खेळाडू असतील तर त्यांना कुठल्याही क्रमांकवर खेळवता येणार नाही. त्यामुळे रोहित आणि विराटला चांगले खेळावे लागेल.” भारताचा पाकिस्तान विरुद्धचा सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.