Rohit Sharma should continue as India captain until T20 World Cup 2024 : एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माच्या कर्णधारपदाने प्रभावित झालेल्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने शुक्रवारी सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत तरी त्याने भारताचे कर्णधारपद कायम ठेवावे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्सने पराभूत केले. रोहित आणि विराट कोहली यांनी १० डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती घेतली आहे.

सौरव गांगुली काय म्हणाला?

सौरव गांगुलीने पत्रकारांना सांगितले की, दोघांनाही पुढील व्यस्त वेळापत्रकासाठी तयार राहण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. रोहितने सर्व फॉरमॅटमध्ये पुनरागमन केल्यानंतर भारताचे कर्णधारपद भूषवायला हवे, कारण विश्वचषक स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली आहे, असे तो येथे एका प्रचार कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणाला. त्याने चमकदार कामगिरी केली. तो म्हणाला, विश्वचषकात तो कसा खेळला ते तुम्ही पाहिले. तो भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. रोहित आणि विराट २०२२ च्या टी-२० विश्वचषकापासून टी-२० क्रिकेट खेळलेले नाहीत. तेव्हापासून हार्दिक पांड्या भारताचा टी-२० कर्णधार आहे पण त्याच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार आहे.

Wasim Jaffer on Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan : ‘जितक्या कौतुकासाठी पात्र होता तेवढे कौतुक कधीच…’, धवनबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, तो संघहिताला…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Sunil Gavaskar Statement on Virat Kohli And Rohit Sharma For Not Playing Duleep Trophy
Sunil Gavaskar: “जेव्हा तिशी पार केलेला खेळाडू…”, विराट-रोहितच्या दुलीप ट्रॉफी न खेळण्यावर सुनील गावसकर संतापले, BCCI ला पण सुनावलं
BCCI Secretary Jay Shah statement on Mayank Yadav
Mayank Yadav : ‘तो टीम इंडियात असेल…’, बीसीसीआयचे सचिव जय शाहांचे मयंक यादवबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, आम्ही त्याच्यावर…
Rahul Dravid son Samit big six video
Samit Dravid : कुणी म्हटलं ‘ज्युनियर वॉल’ तर कुणी भावी ‘हिटमॅन’, द्रविडच्या मुलाच्या षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष
Neeraj chopra mother wins hearts after Olympic final
Neeraj Chopra Mother: सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान; म्हणाल्या…
vinesh phogat disqualification politics (1)
विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर राजकारण का तापलंय?
Rohit Sharma Statement on India Defeat in IND vs SL ODI Series
IND vs SL: “हा काही जगाचा अंत नाही…” मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माचं भलतंच वक्तव्य, म्हणाला, “मला नाही वाटत चिंतेची बाब आहे”

सौरव गांगुलीने सांगितले कारण –

गांगुली म्हणाला, विश्वचषक हा द्विपक्षीय मालिकेपेक्षा वेगळा आहे कारण दबाव वेगळा आहे. भारताने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि सहा-सात महिन्यांनंतर वेस्ट इंडिजमध्ये त्याची पुनरावृत्ती होईल. रोहित हा एक लीडर आहे आणि मला आशा आहे की तो टी-२० विश्वचषकातही कर्णधार असेल. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ किमान टी-२० विश्वचषकापर्यंत वाढवला आहे, जरी त्याचा कार्यकाळ अद्याप उघड झाला नाही.

हेही वाचा – “तुम्ही त्याला लॉलीपॉप दिला…”, युजवेंद्र चहलची टी-२० ऐवजी वनडे संघात निवड झाल्यावर माजी भारतीय खेळाडूचे वक्तव्य

सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष असताना द्रविड प्रशिक्षक झाला होता आणि गांगुलीने त्याच्या कार्यकाळात वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “द्रविडवर विश्वास व्यक्त केल्याने मला आश्चर्य वाटत नाही. मी मंडळाचा अध्यक्ष असताना हे पद स्वीकारण्यासाठी आम्ही त्यांचे मन वळवले होते. त्याचा कार्यकाळ वाढला याचा मला आनंद आहे. भारताने विश्वचषक जिंकला नसला तरी भारतीय संघ स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता. त्यांना सात महिन्यांनंतर दुसरा विश्वचषक खेळण्याची संधी आहे. आशा आहे की यावेळी उपविजेते नसून चॅम्पियन असतील.”

कधी ना कधी तरी नवीन प्रतिभांना संधी द्यावी लागेल –

कसोटी विशेषज्ञ अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले नाही. यावर गांगुली म्हणाला, “कधी ना कधी तरी नवीन प्रतिभांना संधी द्यावी लागेल. भारतात इतके टॅलेंट आहे की संघाला पुढे जावे लागते. पुजारा आणि रहाणे खूप यशस्वी झाले पण खेळ नेहमीच तुमच्यासोबत नसतो. आपण कायम खेळू शकत नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत होईल. भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो.”