भारताचा उदयोन्मुख फलंदाज श्रेयस अय्यरची स्पष्टोक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्णधार विराट कोहलीप्रमाणे धावांचा यशस्वी पाठलाग कोणीही करू शकत नाही. त्याची फलंदाजी पाहूनच मीसुद्धा ही कला अवगत केली आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा उदयोन्मुख फलंदाज श्रेयस अय्यरने व्यक्त केली. श्रेयसने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे नाबाद ५८ आणि ४४ धावांची खेळी साकारली.

‘‘धावांचा पाठलाग करताना किती चेंडूंत किती धावा काढायच्या आहेत, याचे समीकरण तुमच्यासमोर असते. त्याशिवाय गोलंदाजांच्या उर्वरित षटकांचा आढावा घेऊन कधी आक्रमण करायचे हे ठरवता येते. गेली अनेक वर्षे कोहली याच योजनेद्वारे संघाला अनेक सामने जिंकवून देत आहे. मीसुद्धा त्याची फलंदाजी पाहूनच हळूहळू ही कला आत्मसात केली आहे,’’ असे श्रेयस म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli batting runs indian batsman shreyas ayyar akp
First published on: 28-01-2020 at 06:44 IST