सध्याच्या काळात चुकीच्या पद्धतीचं खानपान आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांचं शरीर हे वेगवेगळ्या आजाराचं घर बनलंय. रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत सामावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. रक्तात सारखेची पातळी वाढल्याने हार्ट अटॅक, किडनी फेलियर आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा देखील धोका असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य विशेषतज्ज्ञ मधुमेहग्रस्तांना खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. आपण जे जे अन्न खातो त्याचा परिणाम शरीरातल्या ग्लूकोजवर होत असतो. औषधोपचारसोबतच काही घरगुती उपायांनी ब्लड शुगर लेवल नियंत्रीत ठेवू शकता येतं. मधुमेहग्रस्तांना त्यांच्या आहारात वांगं समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात येतो. वांग्यामुळे शरीरातली ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes patients can add brinjal in diet to control high blood sugar level prp
First published on: 08-10-2021 at 21:03 IST