अनेकदा आपल्या घरी रात्रीचे जेवण शिल्लक असते किंवा आपण सकाळी शिजवलेले अन्न रात्री उशिरापर्यंत खातो. यामुळे आपल्याला पचनाचे अनेक आजार होऊ शकतात. तसेच डॉक्टर देखील सल्ला देतात की आपण ताजे तयार अन्न खावे. तर आयुर्वेदात तुम्हाला अन्नाबद्दल ताजे गरम गरम अन्न खाण्याचे सल्ले देखील देण्यात येतात. यावेळी आयुर्वेद तज्ञ डॉ वरलक्ष्मी यनामंदरा यांनी उरलेल्या अन्नाबद्दल संगितले की, २४ तासांपूर्वी शिजवलेले अन्न न खाणे योग्यतेचे आहे. कारण २४ तास आधी तयार शिजवलेले अन्न खाल्ल्याने तुम्हाला अपचन होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या या धावपळीच्या आणि वेळेच्या कमतरतेमुळे तुम्ही शिजवलेले अन्न बहुतेकदा फ्रीजमध्ये ठेवता. त्यानंतर तेच अन्न तुम्ही पुन्हा गरम करून खाता. पण आयुर्वेदात ते चुकीचे मानले जाते.तसेच यावेळी आयुर्वेद तज्ञ वरलक्ष्मी यांनी संगितले की, ‘जेव्हा आपण अन्न शिजवतो, तेव्हा त्यात पुरेसा ओलावा असतो. पण जेव्हा आपण ते फ्रिजमध्ये साठवतो, तेव्हा त्यात अनेक प्रकारचे रोग निर्माण करणारे जंतू आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. ज्याचे आपण सेवन केल्याने आपल्याला अनेक आजार उद्भवू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you eat leftovers for the rest of the night what is the opinion of ayurveda on this scsm
First published on: 06-10-2021 at 17:27 IST