आंबा म्हणजे फळांचा राजा, त्याचा मधुर स्वाद, गोड चव, त्याच्या सुगंधाची दरवळ अनोखी असते. पिकलेल्या रसदार आंब्यात आणि त्यापूर्वीच्या त्याच्या कच्या कैरीच्या स्वरुपात पोषक अन्नघटकांची रेलचेल असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आंबा एकमेवाद्वितीय असतो. पण आजच्या जगात नीतिमत्ता पायदळी तुडवणे म्हणजे व्यावसायिक कसब मानले जाऊ लागले आहे. याच भावनेतून आंबे नैसर्गिकरीत्या पिकू देण्याऐवजी कृत्रिमरीत्या पिकवले जातात. आंबे पिकवण्याच्या कृत्रिम पद्धतीत कॅल्शियम कार्बाईडचा वापर, आंब्यातील कृत्रिम रंगांचा किंवा काही तीव्र रासायनिक पदार्थांचा फवारा मारून ते पिवळे बनवले जाण्याचे प्रकार होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न व औषध प्रशासनाकडून ठराविक बाजारातील आंबे व्यावसायिकावर कारवाई केल्याच्या बातम्याही आपण वाचतो. पारंपारिक पध्दतीने गवताची आढी घालून ४-५ दिवस ठेवून पिकवण्याऐवजी कृत्रिम पद्धतीत ते काही तासात पिकवले जातात. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे आरोग्यासाठी घातक असतात हे आपल्याला माहित आहेच. आता विशिष्ट आंबा कृत्रिमरित्या पिकवलेला आहे हे नेमके ओळखायचे कसे हे ग्राहक म्हणून प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे. पाहूयात यासंदर्भातील काही महत्त्वाच्या टीप्स…

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to take care while purchasing mango important tips
First published on: 04-04-2018 at 11:43 IST