श्रावण महिना म्हटलं की समोर येते निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह असलेला हा श्रावण महिन्याला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. तसेच महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्यात भक्तांचा विशेष उत्साह दिसून येतो. बरेच लोक या महिन्यात दर सोमवारी (श्रावणी सोमवार) आणि शनिवारी (श्रावणी शनिवार) उपवास ठेवतात. तर काहीजण संपूर्ण महिना उपवास ठेवतात. दिवसभर उपवास केल्यावर संध्याकाळी उपवास सोडतांना काही जणांना पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, निद्रानाश, सुस्ती आणि थकवा अशा अनेक समस्यांना जाणवतात. या समस्या टाळण्यासाठी संध्याकाळी उपवास सोडतांना कोणत्या गोष्टी आहारात घेतल्या पाहिजे त्या जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिंबूपाण्याचे सेवन करा

दिवसभर उपवास केल्यानंतर, जेव्हा तुम्ही संध्याकाळी उपवास सोडता, तेव्हा जेवणाआधी लिंबूपाणी घ्या. यामुळे पोटात तयार होणाऱ्या अ‍ॅसिडपासून सुटका होईल. तुम्ही संत्र्याचा रस किंवा संत्र्याच सेवन देखील करू शकता. कारण त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी तुम्हाला डिहायड्रेशन आणि अशक्तपणापासून दूर ठेवेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Include these foods to break the fast in the month of shravan scsm
First published on: 09-08-2021 at 12:58 IST