अनेक जण बाहेरचं हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंटमधील जेवण आवडीने खातात. तर काहींना ऑनलाईन किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ आवडतात. परंतु बाहेर खाण्याची ही पद्धत तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. होय, कारण बाहेरील अन्नपदार्थांमध्ये अनेकदा भेसळ किंवा स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. यामुळे अन्नातून होणारी विषबाधा आणि पोटाचा संसर्ग यांसारख्या आजारांना बळी पडू शकता. यात विशेषत: पालेभाज्यांपासून तयार केलेले पदार्थ खाणं तुम्ही टाळल पाहिजे. कारण पालेभाज्यांमध्ये अनेकदा वेगवेगळे गवत आणि इतर रानभाज्या देखील असतात ज्या नीट साफ न करताच बनवल्या जातात. त्यामुळे तुम्ही विविध आजारांना बळी पडू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामुळे पालकाची भाजी किंवा कोणत्याही पालेभाज्या हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर खाणं आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. कारण रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूडमध्ये पाले भाज्यांमध्ये बरसीम गवताची भेसळ असू शकते. हे गवत प्राण्यांचे खाद्य आहे त्यामुळे हे जर मानवाने खाल्ले तर पचनसंस्था बिघडू शकते. तसेच अपचन, गॅस आणि जुलाब होऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it safe to eat palak dishes at restaurants hotel and street outside home in marathi sjr
First published on: 22-03-2023 at 17:20 IST