महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र या पदासाठी ७०२ जागांवर भरती निघाली आहे. यासाठी विज्ञान शाखेतील पदवी असणाऱ्या विद्यार्थांना काम करण्याची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यावर किसान मित्रांना काम करावे लागणार आहे. उमेदवारांना सरकार विविध गावांमध्ये उमेदवारी नेमून दिली जाईल. त्या गावांतील शेतकऱ्यांना अधुनिक तंत्रज्ञान प्रचार, प्रसार, कृषीविषयक पायाभूत सुविधांची माहिती द्यावी लागेल. त्याचप्रमाणे ग्रामसभा घेताना विशेष भूमिका बजावावी लागेल. बीएससी(कृषी) किंवा बीएससी (उद्यानविद्या) अशी शिक्षणाची अट आहे. ४६ वयापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
एकूण जागा : ७०२
पदाचे नाव : किसान मित्र
शैक्षणिक पात्रता: B.Sc (कृषी) किंवा B.Sc (उद्यानविद्या)
वयाची अट: ०१ जुलै २०१९ रोजी २१ ते ४६ वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
परिक्षा शुल्क : फी नाही.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2019
जाहिरात (Notification): http://www.majhinaukri.in/sarthi-recruitment
इथं करा ऑनलाइन अर्ज: https://sarthi-maharashtragov.in/