जसजसा ऋतू बदलतो तसतसे आजारही त्यांचे रूप बदलू लागतात आणि ऋतू बदलल्याने अनेक आजारांशी आपल्याला सामना करावा लागतो. असे काही आजार आहेत, जे उन्हाळ्यात लोकांवर अधिक वेगाने हल्ला करतात. जरी हे आजार सामान्य आहेत, परंतु वेळेवर उपचार न केल्यास ते घातक ठरू शकतात. या आजारांवर घरबसल्या उपचार करणे शक्य असले तरी योग्य माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात आजार टाळण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल.
उन्हाळाच्या दिवसात होणारे आजार
हीट स्ट्रोक
हीट स्ट्रोक हा उन्हाळ्यातील सर्वात सामान्य आजार आहे, जो शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ग्रासतो. उन्हाळ्यात हीट स्ट्रोक हा सामान्य मानला जात असला, तरी योग्य वेळी उपचार न केल्यास तो प्राणघातकही ठरू शकतो. हीट स्ट्रोक झाल्यास अन्नातून विषबाधा, ताप, पोटदुखी, उलट्या अशा समस्या सुरू होतात, त्यामुळे त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
हीट स्ट्रोक (उष्माघात) टाळण्यासाठी काय करावे?
हीट स्ट्रोक टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आहाराची काळजी घेणे. होय, उन्हाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर कमजोर होते. या प्रकरणात, रोगांचा धोका वाढतो. त्यामुळेच उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या आणि हिरव्या भाज्या, सॅलड्स आणि फळांचे सेवन नक्कीच करा. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही, ज्यामुळे हीट स्ट्रोकचा धोकाही कमी होईल.
अॅसिडिटी
अॅसिडिटी ही उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या असून प्रवासादरम्यान अॅसिडिटीची समस्या उद्भवली तर प्रचंड त्रास होत असतो. अॅसिडिटीमध्ये छातीत जळजळ आणि दुखणे, उलट्या झाल्यासारखे वाटणे अशा इतर समस्या असतात. अशा परिस्थितीत जेव्हा ही समस्या पुन्हा-पुन्हा उद्भवू लागते तेव्हा ती गंभीर समस्येचे रूप घेते आणि काहीवेळा लोकांना हॉस्पिटलमध्ये जावे लागते. अशा स्थितीत हे टाळण्यासाठी अगोदरच सतर्क राहून अन्न सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
अॅसिडिटी टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे तळलेले आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे, कारण ते अॅसिडिटीचे सर्वात मोठे कारण आहे. यासोबतच जेवणाची वेळ निश्चित करा आणि रोज वेळेवर अन्न खा. याशिवाय एनर्जी ड्रिंक व काढा करून त्याचे सेवन करावे. अॅसिडिटीमध्ये हे फायदेशीर आहे.
कविळ
उन्हाळ्यात लहान मुले किंवा प्रौढ व्यक्तींना काविळीचा धोका वाढतो. कावीळला हिपॅटायटीस ए असेही म्हणतात. काविळीचे सर्वात मोठे कारण म्हणजे दूषित पाणी आणि दूषित अन्न. काविळीमध्ये रुग्णाचे डोळे आणि नखे पिवळी पडतात आणि लघवीचा रंगही पिवळा होतो. याला योग्य उपचार न दिल्यास तो खूप गंभीर स्वरूप धारण करू शकतो, त्यामुळे कविळ झाल्याचे समजतात योग्य काळजी घेत, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या.
कावीळ झाल्यावर दूषित अन्न खाणे टाळावे. याशिवाय तळलेले अन्न अजिबात खाऊ नका, शक्य असल्यास फक्त उकडलेले हलके अन्न खा. फक्त उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या.
कांजण्या येणे
उन्हाळ्याच्या सुरूवातीला अनेकांना कांजण्या येतात. कांजण्या आल्यावर संपूर्ण शरीरावर लाल ठिपके पडतात. यासोबतच डोकेदुखी, ताप आणि घसा खवखवणे ही देखील कांजण्याची लक्षणे आहेत, खोकला किंवा सर्दी ही देखील कांजण्यांमध्ये सामान्य आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये हा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत सावधगिरी हाच त्यावरचा पहिला उपचार आहे.
लहान मुले आणि तरुणांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. कांजण्या टाळण्यासाठी लस दिली जाते, जी यापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो, परंतु याशिवाय काही सावधगिरीने देखील कांजण्या टाळता येऊ शकते.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)