आपल्या भारतीय संस्कृतीत चार आश्रमांचा उल्लेख केला गेला आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आयुष्याला अशा चार टप्प्यांमध्ये मांडणी करण्याचे उद्दिष्ट असे की मानवाने या प्रत्येक टप्प्यात परिस्थितीनुसार स्वतचा विकास व आनंद वृद्धिंगत करावा. ब्रह्मचर्य व गृहस्थाश्रमात प्रत्येकाची शारीरिक, मानसिक व आíथकदृष्टय़ा भरभराट होत असते. परंतु वानप्रस्थाश्रमाचे काय? वानप्रस्थाश्रम म्हणजे थोडक्यात निवृत्तीनंतरचे आयुष्य. आपल्याकडे तर निवृत्ती म्हणजे सुटलात सगळ्यातून! असा शेरा दिला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात साधारणत: सेवानिवृत्तीनंतर किवा साठ वर्षांवरील व्यक्तींना वृद्ध संबोधण्यात येते. भारतातील सात टक्के लोकसंख्या वृद्धांची आहे. २०१६ पर्यंत ती दहा टक्क्य़ांपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. वैद्यकीय सोयीसुविधा तसेच आधुनिक वैद्यक शास्त्रातील प्रगतीमुळे आयुष्यमानात वाढ होत आहे. २०२५ पर्यंत भारतात वृद्धांची संख्या एक कोटी ७७ लाखांचा टप्पा गाठेल असे वर्तवण्यात आले आहे. आता प्रश्न असा आहे की, वानप्रस्थाश्रमात काय विकास करायचा आहे बुवा? परंतु खरे सांगायचे तर वार्धक्य काळात आपण स्वतचा शारीरिक व मानसिकदृष्टय़ा जास्त काळजी घेऊ शकतो, कारण आपण स्वत:साठी जास्त वेळ देऊ शकतो. शारीरिकदृष्टय़ा म्हणाल तर वय होणे ही नसíगक प्रक्रिया आहे. त्यावर कुणाचाही अंकुश नाही. परंतु साठीनंतरही स्वतला सशक्त व निरोगी ठेवणे ही एक कलाच म्हटली पाहिजे. उत्तम व योग्य आहार आणि त्याचबरोबर नियमित व्यायाम हीच निरोगी व सशक्त वार्धक्य घालवण्याची गुरुकिल्ली आहे.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information on old age diet
First published on: 23-01-2016 at 02:48 IST