कौस्तुभ जोशी – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अर्थव्यवस्थेच्या गेल्या १० वर्षांतील वाटचालीची विभागणी तीन प्रमुख टप्प्यांत करता येईल. पहिला टप्पा म्हणजे २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने अनुभवलेली संख्यात्मक वाढ, त्यात झालेले धोरणात्मक बदल आणि भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक वाटेल अशी घोडदौड. साधारण नोटबंदीच्या काळापासून सुरू झालेला दुसरा टप्पा आíथक अनिश्चितता ठळकपणे दर्शवतो. ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा एका रात्रीत चलनातून हद्दपार करण्याच्या सरकारपातळीवरील निर्णयामुळे रोख स्वरूपातील चलनाचा वापर करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत त्सुनामी आली. हातावर पोट असलेले मजूर, शेतकरी, लघुउद्योजक आणि मोठे उद्योगधंदे अशा सर्वावरच नोटबंदीची कुऱ्हाड कोसळली. नोटबंदीचे यशापयश हा प्रस्तुत लेखाचा उद्देश नाही. नोटबंदीनंतर डिजिटल चलन अधिक वापरले जाऊ लागले, हे खरे असले तरीही त्यासाठी नोटबंदी हा काही सुज्ञ उपाय नाही.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus pandemic investment in pandemic lokprabha investment special issue 2021 guntavnuk vishesh dd
First published on: 07-05-2021 at 16:42 IST