खरं सांगायचं तर स्वातंत्र्य हा शब्दच मला कळत नाही. कारण आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. लोक स्वत:चं अस्तित्व निसर्गापेक्षा वेगळं मानतात म्हणून स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण होतो. माणूस निसर्गाचा भाग आहे असं म्हटल्यावर त्याने निसर्गाप्रमाणे चालणं हे त्यात आलंच. त्याप्रमाणे तुम्ही नाही चाललात तर तुमचा नाश होणार हेही तेवढंच ठरलेलं आहे. आज आपण जे सगळं अनैसर्गिक पद्धतीने जगतो आहोत त्याचे परिणाम दिसताहेतच. त्यामुळे निसर्गाचा भाग असण्यातून आपण बाहेर पडलो तर त्याला स्वातंत्र्य म्हणायचं का हा एक पहिला प्रश्न आहे. ही संकल्पना कुठे सुरू झाली याचा विचार केला तर असं लक्षात येतं की तुम्हाला जे करायचं आहे ते करायला मिळालं नाही तर स्वातंत्र्य नाही, असं आपण म्हणतो. पण मग ते नेमकं काय आहे याचाही विचार झाला पाहिजे. आपण अप्पलपोटीपणे, स्वार्थासाठी स्वत:ला जगवणे किंवा स्वत:ची प्रगती जास्त करणे या संकल्पनेतूनच हा संघर्ष तयार होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण एक साधं उदाहरण घेऊ. माणूस या प्रजातीकडून निसर्गाला काय अपेक्षित आहे तर त्याने थोडं चालायला पाहिजे, अन्न शोधायला पाहिजे. पाणी शोधायला पाहिजे, निवारा शोधायला पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक त्या हालचाली त्याने करायला पाहिजेत. निसर्गात जे मिळतं ते खायला पाहिजे. आज काय दिसतं तर इतकी वर्षे निसर्गाबरोबर जोडून घेऊन, उत्क्रांती होत होत माणूस जगत आला आहे. पण आज त्याचं काय चाललंय तर ते नातं तोडायचं आणि आपण काहीतरी वेगळं करायचं. याउलट तुम्ही जर सगळे प्राणी बघितले, तर काय दिसतं तर वाघ किंवा सिंह आहे, त्याला िपजऱ्यात ठेवलं आणि त्याच्यासमोर बर्गर, बकरं आणि काहीतरी ठेवलं तर तो कोणत्याही परिस्थितीत बर्गर खाणार नाही. तो सहसा त्याच्या नैसर्गिक सवयींच्या बाहेर येत नाही. अनैसर्गिक वागत नाही. माणसं वगरे तो स्वत: जखमी झाला तरच खातो. अन्यथा तो प्राणीच खातो. त्याला हवं तसं वागायचं स्वातंत्र्य नाही का, तो नैसर्गिक सवयींच्या बाहेर येऊ शकत नाही का, तर तसं अजिबात नाही. पण तो निसर्गाबरोबर राहतो. तेच आपण टाळतोय.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr madhav rege special article on independence day
First published on: 11-08-2017 at 22:07 IST