नोटा निश्चलनीकरणाचा नेमका अर्थ गावगाडय़ाला माहीत नाही. त्यांना इतकंच कळतं की पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यात आणि यामुळेच आमच्या गावगाडय़ाची चाके रुतलीत. ‘रब्बीचा हंगाम तोंडावर आलाय आन बियाणे -खत घ्याचं अवघड झालंय,’ असे चिपरीचे भगवान कांबळे सांगतात. ‘भाजीपाला मायंदाळ पिकलंय. पण विक्रीला गेलं तर दर बी न्हायी आणिक सुटय़ा नोटांची ओरड हाय बघा,’ अशा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटा निश्चलनीकरणाचा निर्णय झाला आणि खेडय़ापाडय़ात काळा पसा कायमचा जाणार अशा चच्रेला ऊत आला. तरुण पोरं समाजमाध्यमातून या निर्णयाच्या स्वागताचा डंका वाजवू लागले. आणि पारावर ‘आता बरकत येणार बरं का ’ असं जो तो एकमेकांना ऐकवू लागला. ही वावटळ दोन-चार दिवस कायम राहिली. पण, परिस्थितीचे चटके बसू लागले आणि अवघा गावगाडा भानावर आला. ग्रामीण भागाचे चलनवलन थंडावले आहे. ही कोंडी किती काळ चालणार या विचाराने शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, छोटे व्यावसायिक असे सारेच गोंधळून गेले आहेत.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur impact of cashless on milk business and farmers
First published on: 02-12-2016 at 01:28 IST