आपल्या हातातले स्मार्टफोन, आपल्या घरातलं वॉशिंग मशीन, एसी ही सगळी कृत्रिम बुद्धिमत्तेची प्राथमिक उदाहरणं आहेत. ही बुद्धिमत्ता येत्या १५-२० वर्षांत एवढी विकसित होईल की अवघं मानवी जीवनच बदलून जाईल. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या बदलांची पायाभरणी या वर्षांत घातली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकांनी ३० ते ४० वर्षांपूर्वी माणसाच्या दररोजच्या जीवनात डोकवायला सुरुवात केली आणि आज त्यांच्याशिवाय जगण्याचा विचार आपण नाही करू शकत. अगदी हीच परिस्थिती येत्या काही काळात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून चालू शकणाऱ्या साधनामुळे निर्माण होणार आहे. या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असणाऱ्या साधनांनी आपल्या आयुष्यात यायला सुरुवात केली आहेच आणि लवकरच त्या साऱ्या  गोष्टी आपल्या दररोजच्या जीवनाचा भाग होऊ पाहताहेत. अनेक प्रगत राष्ट्रं, आणि भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांनी हे तंत्रज्ञान देशभरात राबविण्यासाठी विविधसूत्री कार्यक्रम आखले आहेत. राष्ट्र आणि त्यांच्या तयारीबाबत चर्चा करण्याआधी आपल्या डोक्यात येणाऱ्या टिपिकल मानवी प्रश्नांचं निरसन करून घेऊया. सर्वसामान्यांना या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ चा खरंच फायदा होऊ शकणार आहे का..? याचं उत्तर आहे.. ‘‘हो’’! आता तरी काही प्रमाणात आपण या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत आणि येत्या काळात हे तंत्रज्ञान आपलं आयुष्य व्यापेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Machinery and intelligence
First published on: 13-01-2017 at 01:30 IST