‘जे आहे ते असं आहे’ असा थेट विचार करणारी आजची पिढी. तरुण पिढीचं विचार करण्याचं चक्र खूप वेगाने फिरत असतं. शिवाय त्याला अनेक कंगोरेही असतात. त्यांच्या ‘वैचारिक स्वातंत्र्या’कडेही बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक छोटीशी गोष्ट. राजकन्येची म्हणा किंवा परीची. तिला कशाचीही कमी नसते. जे हवं ते समोर हजर. तोंडातून शब्द काढायची खोटी फक्त. मात्र तिच्या बाबतीत एक गोष्ट अगदी कटाक्षाने पाळली जाते, ती म्हणजे लोकांचा कमीत कमी संपर्क. तिला शिक्षण देण्यासाठी येणारे शिक्षक आणि कुटुंब सोडता तिचा बाहेरच्या जगाशी असणारा संपर्क शून्य. त्यात एक गोष्ट अगदी तिच्या मनावर बिंबवली गेली की, शिक्षक आणि घरचे सांगतील तेच योग्य. त्यात तिला सतत कोणी ना कोणी सांगायला असायचंच. त्यामुळे झालं काय, तर स्वत:चा म्हणून असा काही विचार करायचा असतो हे तिच्या गावीही नव्हतं. कारण कळायला लागल्यापासून ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ अशी तिची अवस्था. तिचं संकुचित जग आणि ती. डबक्यात असलेल्या माशासारखी तिची ती अवस्था एकप्रकारे मानसिक गुलामगिरीच म्हणायला हवी.
सांगायचा मुद्दा हा की, आपण स्वातंत्र्याचे कितीही गोडवे गात असलो तरीही आपलं संपूर्ण आयुष्य ज्यावर बेतलेलं असतं, ते मूलभूत विचारस्वातंत्र्य आजच्या पिढीच्या आणि सगळ्यांच्याच म्हणा, आयुष्यात नक्की आहे का, हा प्रश्न ज्याचा त्याने स्वत:ला येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विचारायलाच हवा. संविधानात अपेक्षित असणारं स्वातंत्र्य हे मूळ आपल्या मनातल्या विचारांमध्ये दडलेलं असतं. दर स्वातंत्र्य दिनाला फक्त देशभक्तीपर गाणी गाऊन आणि झेंडावंदन करून साजरी करण्याची ही गोष्ट नाही. तर रोजच्या आयुष्यात क्षणाक्षणाला प्रत्यक्षात आणण्याची गोष्ट आहे ती. एकदा का विचारांवर कब्जा मिळवला की पुढची अरेरावीची वाट सोपी असते. कारण इतर कोणत्याही स्वातंत्र्याआधीचं मूलभूत स्वातंत्र्य आहे ते. जिथून व्यक्तीच्या अस्तित्वाला सुरुवात होते आणि ते नसेल तर व्यक्तीचं अस्तित्व संपतंही. माणूस फक्त त्याच्या हाडामांसाच्या असण्यामुळे नाही तर विचारांच्या असण्याने आपलं अस्तित्व टिकवून असतो. किती पैलू असतात स्वातंत्र्याला. मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक. त्यातही खाण्याचं, शिक्षणाचं, अभिव्यक्तीचं, लैंगिकतेचं, वाचन, लेखन, पाहणं, ऐकणं अ‍ॅण्ड सो ऑन. यातला प्रत्येक पैलू म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण या सगळ्या गोष्टींच्याही आधी येतं ते विचारांचं स्वातंत्र्य. आजची पिढी या बाबतीत मागच्या पिढीपेक्षा कितीतरी पुढे आहेच. पण स्वत:मधल्या विरोधाभासांना सामोरं जाताना अजूनही कमी पडतो आम्ही, हे जाणवत राहतं आत.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence day special
First published on: 14-08-2015 at 01:25 IST