विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये केंद्रिय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले. हा हल्ला घडवून आणणाऱ्या जैश ए मोहमद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या बालाकोट येथील प्रशिक्षण केंद्रांवर त्यानंतर  भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक केला. या दहशतवादी हल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तब्बल १३ हजार ८०० पानांचे आरोपपत्र बुधवारी दाखल केले असून त्यात तपासाचे कौशल्य पूर्णपणे पणाला लावण्यात आले आहे. अर्थात याची कल्पना पाकिस्तानला असावीच. कारण त्याचे महत्त्व कमी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने जागतिक पातळीवर एक प्रयत्नही याच आठवडय़ात करून पाहिला. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर ठेवलेल्या विधानप्रस्तावाची ‘विसंगत आणि हास्यास्पद’ असे म्हणत भारताने वासलात लावली.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pakistan relationship and pulwama attack mathitartha dd70
First published on: 28-08-2020 at 08:17 IST