धनंजय कुमार – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेते आकाशातून पडत नाहीत आणि कुठल्या कारखान्यात तयार होत नाहीत. ते जमिनीतून अंकुरतात. संस्कार, संवेदना, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादांमध्ये त्यांचे संगोपन होते. ते शोषण-अन्याय पाहून उद्विग्न होतात. ते स्वत:ला सामाजिक प्रयोगशाळेत घडवतात आणि मग इतरांसाठी  सुगम मार्ग शोधतात. जोपर्यंत कमकुवत व्यक्तींचे दु:ख तुम्हाला दु:खी करत नाहीत, अस्वस्थ करत नाही, तोपर्यंत तुम्ही नेता होऊ शकत नाही. गांधीजींचा नेता होण्याचा प्रवास पाहिला, तर खूप काही स्पष्ट होते. गांधीजी लहानपणी सामान्य मुलांप्रमाणेच होते, ते खोटेही बोलायचे आणि जिथे अस्वस्थ/ असहज वाटायचे, तिथून सुटका करून घेण्यासाठी मार्ग शोधायचे. त्याच क्रमाने, मुंबईतील न्यायालयात महिनोन्महिने ये-जा करूनही ते खटला लढवण्यासाठी धैर्य मिळवू शकले नाहीत. खरे बोलण्याचा संकल्प त्यांच्या मार्गात आडवा येत असावा. दक्षिण आफ्रिकेला जाण्याची गोष्ट आली तेव्हा वकिली करण्यातील अडचणींमुळे गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा पर्याय स्वीकारला. आपल्या आईकडून मिळालेली शिकवण बरोबर घेऊन गेले आणि त्याचे पालन होईल याचा पूर्ण प्रयत्न केला. मग ती मांसाहार न करण्याची गोष्ट असो किंवा आपल्या कौटुंबिक संस्कारांचे पालन करण्याची गोष्ट असो.. स्वत: बदलण्याऐवजी गांधीजींनी पारंपरिक मार्ग शोधला. गुजराती समाजाशी जोडले गेले. परंतु तिथे नियमाविरुद्ध घडते आहे, अन्यायकारक घडते आहे, असे पाहिले तेव्हा तेव्हा तिथे विरोध केला. माणसामाणसांतील भेदभाव पाहिला, ब्रिटिश भारतीयांसोबत अत्यंत अमानुषपणे वागतात, अमानवी व्यवहार करतात हे पाहिले तेव्हा त्यांना वाईट वाटले. त्यांचे हृदय पिळवटून निघाले आणि विरोधासह सेवेचा मार्ग त्यांनी स्वीकारला. सेवा आणि विरोधासोबत ते सत्य, निष्ठा आणि अहिंसा या तत्त्वांवर ठाम होते. ब्रिटिशांनी त्यांचा अपमान केला, त्यांना मारहाण केली, परंतु गांधीजींनी सत्य, अहिंसा, प्रतिकार आणि सेवा यांचा मार्ग सोडला नाही. आणि या निष्ठेने गांधीजींना ‘महात्मा गांधी’ या मुक्कामापर्यंत नेले.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhi smaran dd70
First published on: 22-01-2021 at 07:06 IST