विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
कविवर्य, गीतकार गुलजार यांना ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात एकदा प्रश्न विचारला होता, सर्वात जास्त आनंद केव्हा होतो, त्या वेळेस ते उत्तरले होते, आपण कुठेतरी दूर प्रवासात असतो. कोणत्या तरी एका रस्त्यावर चहाच्या ठेल्यावर किंवा धाब्यावर क्षणभर उसंत घेत असतो आणि जवळच असलेल्या ट्रकमध्ये आपल्याच गीताचे सूर ऐकू येतात. पुढे प्रवासात तेच गीत, तेच सूर वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू येतात. गाणं तुफान लोकप्रिय झाल्याची ती पावतीच असते.. तो सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो. कार्यक्रम संपल्यावर गुलजारजींना विचारलं, खरं तर कोणतंही एफएम चॅनल लावलं किंवा मग कुठंतरी गाणी लावलेली आहेत, स्थळ कुठलंही असलं तरी अनेकदा आवाज लताबाईंचाच असतो. मग त्याला काय म्हणणार.. त्यावर गुलजारजी उत्तरले होते.. वो तो आसमाँ है. धरतीपर कहींभी जाओ आसमाँ तो होगाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लताबाईर्ंचे सूर हे असे आसमंतात सर्वत्र भरून राहिलेले असणारच. त्या देहाने हयात नसल्या तरीही, आणि हाच त्यांच्या कारकीर्दीचा विशेष आहे. मरावे परी, कीर्तीरूपे उरावे असे समर्थ रामदास म्हणतात तेव्हा त्यात कीर्ती म्हणजे केवळ लोकप्रियता नव्हे तर कार्यकर्तृत्वच अपेक्षित असते. लताबाईंचे कर्तृत्व हे असे शब्दश दशांगुळे व्यापून उरणारे असेच आहे. केवळ हजारोंच्या संख्येमध्ये गाणी एवढेच ते संख्याशास्त्रीय नाही तर गुणवत्तेच्या कसावरही त्या पूर्णत्वास उतरतात. राग- लोभ, आनंद-सुख, दुख, प्रेम, माया, रुसवा -फुगवा, करुणा आदी आणि अशा जेवढय़ा म्हणून भावना माणसाला व्यक्त करता येतात त्या त्या सर्व भावना व्यक्त करणारी गीते लताबाईंनी गायली. त्यामुळे साहजिकच व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाला आवडणारे, त्याच्या थेट काळजाला भिडणारे असे एक तरी गाणे लताबाईंचे असतेच असते. ‘लोकप्रभा’च्या ‘अनाहत नाद’ या प्रस्तुत ‘लता मंगेशकर विशेष’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू, शर्मिला टागोर या सर्वानीच ‘अभिनेत्रींचा आत्मा’ असा लताबाईंचा उल्लेख केला आहे.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mengeshkar anahat nad mathitartha dd70
First published on: 12-02-2022 at 13:18 IST