पैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. हेच ‘परीघ’ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकातल्या हुबळी शहराजवळ असणाऱ्या आळद हळ्ळी या गावची मुलगी मृदुला. गावच्या निरागसतेने आणि सौंदर्याने नटलेली. जीवनाबद्दल अतीव उत्साह आणि प्रत्येक बाबतीत पराकोटीची आसक्ती असणारी मृदुला. वैद्यकीय शिक्षण घेण्याची आर्थिक आणि बौद्धिक कुवत असूनही केवळ शिकवायला आवडतं म्हणून ती शिक्षिका झाली होती.

मराठीतील सर्व पुस्तकाचं पान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review parigha
First published on: 29-04-2016 at 01:19 IST