ज्या  शेतकऱ्याने पिकवलेले धान्य काही पैसे देऊन आपणास सहज उपलब्ध होते, ज्यावर आपण सधन लोक पिढय़ान्पिढय़ा वर्षांनुवर्ष आपल्या पोटाची भूक भागवतो अशा समस्त शेतकऱ्यांची व्यथा लेखक रुद्राक्ष कदम यांनी ‘महापूर’ या कादंबरीतून आपल्यासमोर मांडली आहे. सदा नावाच्या गोदावरी नदी किनारी ‘आडवळणी’ नावाच्या गावात राहणाऱ्या शेतकऱ्याची ही कथा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतात पिकणारे धान्य हे एकच एक शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. त्याचे भवितव्य हे पूर्णत: निसर्गाच्या लहरी स्वभावावर अवलंबून असते. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. रोज दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट पाहात असतो. एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की शेतकऱ्याचे उसने अवसान व मनोधैर्य खचू लागते.

मराठीतील सर्व पुस्तकाचं पान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review
First published on: 27-11-2015 at 01:12 IST