विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर ‘इशारा देऊन त्यानंतर कार्यवाही’ असे निसर्गाने करण्याची काहीच गरज नाही. मात्र निसर्ग हा त्याच्या नैसर्गिक पद्धतीनेच वागतो. माणसाने धरबंद सोडला किंवा माणूस बेशिस्त झाला म्हणून निसर्ग बेशिस्त वागत नाही. तो वेळोवेळी इशारे देत असतो. आपणच ते ऐकत नाही किंवा मग त्या इशाऱ्यांकडेच काणाडोळा करतो.. अखेरीस व्हायचे तेच होते. आपल्या आकांक्षा भुईसापट तरी होतात किंवा वाहून तरी जातात. खरे तर १५ ऑगस्ट २०११ रोजीच निसर्गाने त्याच्या पद्धतीने उत्तराखंडमधील ऋषीगंगा नदीवरील वीज प्रकल्पाबाबत इशारा देण्याचे काम अगदी पहिल्याच दिवशी केले होते. लुधियानाच्या राजित पेंटस् ग्रुपचे मालक राकेश मेहरा त्यांच्या कंपनीच्या एका प्रायोगिक छोटेखानी जलविद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी चमोली येथे आले होते. त्याचवेळेस वरच्या बाजूस असलेला एक मोठा शिलाखंड कोसळून त्याखाली त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या वेळेस अपवादात्मक घटना म्हणून त्याकडे पाहिले गेले. मात्र त्याचवेळेस निसर्गाने दिलेली इशाऱ्याची ती घंटा आपण ऐकली असती तर? कदाचित चार दिवसांपूर्वी येथील धरण आणि त्यावर काम करणारे सर्व कर्मचारी वाहून जाण्याची घडलेली घटना आपल्याला टाळता आली असती!

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand disaster rishiganga power project glacier breaks off at chamoli mathitartha dd70
First published on: 12-02-2021 at 13:20 IST