परवा परवाच दिल्लीमधील औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम असे करण्यात आले. मागे बॉम्बेची मुंबई झाली. मद्रासचे चेन्नई झाले. लहान-मोठय़ांच्या तोंडी असलेले व्ही.टी. (व्हिक्टोरिया टर्मिनस) सी.एस.टी. (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) झाले. मराठवाडा विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झाले आणि पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नामांकन मिळाले. कधी सहजरीत्या आनंदाने तर कधी धरणे आंदोलने करून हे बदल घडले. घडवले जातच राहतील. पुरातन नावे, विशेषत: ऐतिहासिक नावे बदलण्यामागे कधी काळी आपल्या अस्मितेला डागाळणाऱ्या पराभवाचा, एक पराभूत मनोवृत्तीचा आविष्कार असतो. बदला घेण्याची भावना असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक दृष्टीने आपल्या नेत्याला योग्य प्रतिष्ठा मिळाली नाही म्हणून त्याच्या नावाचा आग्रह धरला जातो. तसा खटाटोप होतच राहतो. चळवळी होतात. नवीन नामकरण करते वेळी तर राजकीय लाभ उठवण्यासाठी दुसरा कुठलाही संदर्भ विचारात न घेता सर्रास त्याच त्याच नावाचा जयघोष होतो. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे कित्येकांनी सुचवूनसुद्धा न्हावा-शेवा बंदराला शिवाजी महाराजांच्या आरमारप्रमुखाचे- कान्होजी आंग्रे – यांचे नाही दिले गेले.

मराठीतील सर्व वाचक लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renaming historic properties and roads
First published on: 08-01-2016 at 01:18 IST