डॉ. अजित कानिटकर kanitkar.ajit@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२१ मध्ये ‘खाउजा’ (खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणाला तीस वर्षे पूर्ण झाली. ‘खाउजा’ धोरणांची व्याप्ती वाढण्यापूर्वीच्या माझ्या पिढीतील अनेकांना त्यापूर्वीची ३०-४० वर्षांची सकाळ अजूनही स्मरणात असेल. पेंगुळलेल्या अवस्थेत पहाटे दुधाची ‘टोकन’ सांभाळत शासकीय दूधविक्री केंद्राबाहेर अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर काचेच्या बाटलीत मिळालेले अर्धा किंवा एक लिटर दूध घेऊन घरी आल्यानंतर आम्हाला जणू छोटी लढाईच जिंकल्याचा आनंद होत असे. सणासुदीच्या काळात आणि उन्हाळ्यात दुधाचा तुटवडा असणार, हे तेव्हा लोक गृहीतच धरत असत. उन्हाळ्यात ‘पिवळ्या’ सायीचे, वास येणारे दूध हे भुकटीपासून बनवलेले असायचे (ते ताजे दूध नसे.) हे कळायला बरीच वर्षे जावी लागली. घराघरांत तेव्हा पत्र्याचे ‘अमूल’ पावडरचे डबे असायचे. ताज्या दुधाची तहान पावडरच्या दुधावर भागवीत १९४७ ते १९८०-८५ अशी ४० वर्षे भारताने अनुभवली. अशा अभूतपूर्व अभावातून दुधाच्या प्रवाही महापुरापर्यंत देशाला घेऊन जाणाऱ्या चरित्रनायकाचे नाव आहे डॉ. वर्गीस कुरियन! २६ नोव्हेंबर २०२१ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष.   भारतात ‘श्वेतक्रांती’(Operation Flood) द्वारे दुधाची सर्वदूर उपलब्धता करून देणाऱ्या या क्रांतिकारकाचे स्मरण नक्कीच उचित ठरावे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on 100th birth anniversary of amul man dr verghese kurien zws
First published on: 21-11-2021 at 01:01 IST