तत्कालिन पूर्व पाकिस्तानातील नागरी लोकसंख्येच्या कत्तलीविरोधात  बंगाली गनिम उभे ठाकले. त्यांना पाठिंबा देणाऱ्या भारताला पुढे  बांगलादेश मुक्तीसंग्रामात अपरिहार्यपणे महत्त्वाची भूमिका निभवावी लागली. यात स्वतंत्र बांगलादेशची निर्मितीही झाली. परंतु त्या काळच्या (आणि आजही) जागतिक सत्ता समतोलाच्या राजकारणावर वरचष्मा असलेल्या अमेरिकेने मुक्तीसंग्रामकाळात भारतविरोधी कारवायांचा पाठपुरावा केल्याचे मात्र फारसे प्रकाशात आले नाही. अमेरिकेच्या याच कारवायांचा अन्वयार्थ लावणाऱ्या गॅरी बास लिखित आणि दिलीप चावरे अनुवादित व डायमंड पब्लिकेशन प्रकाशित ‘ब्लड टेलिग्राम’ या आगामी पुस्तकाच्या प्रास्ताविकातील अंश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ढाक्यामधले अमेरिकेचे वाणिज्यदूत आर्चर ब्लड एक सज्जन राजनैतिक अधिकारी होते; पण उपदूतावासाच्या मेणचट कचेरीबाहेरच्या जीवघेण्या उकाडय़ात ते शहर मरू घातलं होतं. २५ मार्च १९७१ च्या रात्री पाकिस्तानी लष्कराने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात आणि आजच्या स्वतंत्र बांगलादेशात सगळीकडे अविरत हल्ले सुरू केले. एकटय़ा ढाका शहरात अगणित लोकांना गोळ्या घालण्यात आल्या, बॉम्बस्फोट घडवून आणून किंवा जाळून टाकून अनेकांना संपवण्यात आलं.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America india and the creation of bangladesh
First published on: 09-10-2016 at 01:59 IST