एखादी व्यक्ती आपल्याला आयुष्यात काय करायचंय, हे एका टप्प्यावर आल्यावर ठरवते. अनुभवातून शहाणपण येतं. शहाणपणातून समंजसपणा. समजूतदारपणे जग बघताना जग वेगळं दर्शन देतं. काय करायला हवं, हे सांगत जातं. गरजा समजतात. अनेक गोष्टी सोसाव्या लागतात. समाजातल्या पृष्ठभागावरच्या समस्या आणि तळातल्या समस्या सोडवण्याचे मार्ग सापडतात. कोणत्या वाटेने गेल्यावर समस्या सुटेल, हे समजतं. माणसांचा अनुभव येणं नि माणसांनी अनुभव देणं, हे घडतं. त्यातून जगाकडे नि जगण्याकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल होतो. ही दृष्टी समाजासाठी विधायक असते. प्रारंभी असणारा राग, चीड नष्ट होते नि चिंतनशील समाजमनस्कता काम करू लागते. ‘रात्रंदिन आम्हां..’ हे विलास चाफेकर यांचं आत्मकथनही हेच सांगते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक दिशांनी विलास चाफेकर यांचं आयुष्य प्रवास करतं. हा प्रवास त्यांच्यापुरता सीमित न राहता कोणाला तसा प्रवास करायचा असेल तर त्याच्या तयारीसाठी उपयोगी पडतो. चाफेकर यांचं प्रत्यक्ष आयुष्य आणि पुस्तक  वेगळं राहिलेलं नाही. याचे कारण ते काहीच लपवीत नाहीत. सगळं आयुष्य लख्खपणे उलगडत जातात. त्यासाठी फार मोठं धाडस लागतं. कारण ते सर्व व्यक्त केल्यावर नवेच प्रश्न आयुष्यात निर्माण होतात. कधी लेखक एकटा असतो, एकटा जगतो, एकटा फिरतो. कधी सोबत खूप मोठा समविचारी माणसांचा तांडा असतो. मतभेद होतात. सगळं स्वीकारून न कोसळता पुढे जाणं घडतं. बऱ्याचशा आत्मचरित्रांतून ‘मी किती सोसलं’, हे सोसून ‘मी किती ग्रेट’ हा भाव असतो. त्यात काटे, खाचखळगे, रक्तबंबाळ होणं, त्रास यांचं भांडवल केलेलं असतं. इथे असं काहीच नाही. उलट, हे घडलं म्हणून बरं झालं, मी जगायला शिकलो, ही जगण्यावरची भक्ती दिसते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Autobiography in marathi book ratrandin amhan by vilas chafekar
First published on: 28-05-2017 at 02:46 IST