महर्षी व्यासाचं ‘महाभारत’ हा असा ग्रंथ आहे की त्याच्या प्रत्येक वाचनात, त्याचे नवनवे अर्थ उलगडू लागतात. त्यातील पात्रं, त्यांचे स्वभाव, वागणं, बोलणं, त्यांच्या वृत्ती – प्रवृत्ती – कृती, त्यांचं प्राक्तन, त्यातील घटितं यांचा वर्तमान संदर्भातही, मानवी पातळीवर नव्यानं विचार करता येतो. ‘महाभारता’तील पात्रांच्या मृत्यूच्या तऱ्हाही किती भिन्न आहेत. केवळ मरणच नव्हे, तर पात्रांच्या अमरत्वातही विविधता आहे. आचार्य द्रोणपुत्र अश्वत्थामा तर चिरंजीव. पण तो शापित. महर्षि व्यास, परशुराम, हनुमान, कृपाचार्य, बळीराजा, बिभीषण यांच्याप्रमाणेच अश्वत्थामाही चिरंजीव. पण कौरव-पांडवांच्या महायुद्धाच्या अखेरीस अश्वत्थाम्याकडून होणारं पशुतुल्य वर्तन त्याला ‘शापित’ करतं आणि हा शाप त्याला मिळतो तोही श्रीकृष्णाकडून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर अश्वत्थामा हा प्रत्यक्ष रुद्राचा – शंकराचा – अंश. जन्मत:च त्याच्या माथी रुद्राशी संबंधित, प्रकाशमान होणारा नीलमणी. महायुद्धाअखेरीस त्यानं विवेकशून्यतेनं योजलेल्या अस्त्रामुळे, पशुवृत्तीनं केलेल्या हत्याकांडामुळे तो नीलमणी श्रीकृष्ण अर्जुनाकरवी काढून घेतो. त्या ठिकाणी उरते ती प्रचंड वेदनादायक, रक्त- पू यांनी युक्त एक भळभळणारी जखम. त्यातून येणाऱ्या दरुगधीमुळे माणसंही त्याच्यापासून लांब पळतात. त्याला एकाकी जीवन जगावं लागतं. हा शाप त्याला भोगायचा आहे, तो तीन हजार र्वष. त्या व्रणाचा दाह शमविण्यासाठी तेलाची भीक मागत त्याला वणवण करावी लागते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review mi ashwathama chiranjeev by ashok samel
First published on: 09-10-2016 at 02:08 IST