प्रफुल्ल शिलेदार हे नव्वदोत्तरी कवितेतले एक महत्त्वाचे कवी आहेत. त्यांचा यापूर्वी ‘जगण्याच्या पसाऱ्यात’ हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. एकूणच नव्वदोत्तर काळात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर जागतिकीकरणाच्या उमटलेल्या खुणांचे, ओरखडय़ांचे अचूक आकलन त्यांच्या कवितांमध्ये दिसते. बदलांच्या या सगळ्या वादळी आवेगात सापडलेले मानवी मन, मूल्ये, संस्कृती, भाषा यांसह मानवी जगण्याला आलेले भरकटलेपण आणि दिशाहीनता त्यांनी कवितेमधून अचूक टिपली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पायी चालणार’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रहदेखील त्यांच्या कवी म्हणून असलेल्या लौकिकात भर घालणारा आहे. कवितेच्या व्यासपीठीय झगमगाटापासून दूर राहून अव्यभिचारी निष्ठेने जी कविता प्रफुल्ल शिलेदार लिहीत आहेत, त्या कवितेत त्यांच्या या निष्ठेचे पुरेपूर प्रतिबिंब उमटले आहे. नव्वदोत्तर काळात ‘खाउजा’ धोरणामुळे आलेली नव्या स्वरूपातली भांडवलशाही, यांत्रिकीकरण, नेट आणि मोबाइल क्रांती, जगभरात उफाळलेली युद्धसदृश्य परिस्थिती, दहशतवाद, मूलतत्त्ववादाची उचल, स्त्री-अत्याचार, पर्यावरणऱ्हास, जीवनमूल्यांचा ऱ्हास आणि या सगळ्याबद्दल लिहू, बोलू पाहणाऱ्या साहित्यिक विचारवंतांची होणारी मुस्कटदाबी असे सगळे भीषण वास्तव माणसाच्या उंबरठय़ाआत येऊन पोहोचले आहे. आणि जणू संपूर्ण मानवी अस्तित्व व संस्कृतीच विनाशाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे. प्रफुल्ल शिलेदारांची कविता या सगळ्या विदारक वास्तवाच्या दर्शनाने व्यथित होते आणि या पाश्र्वभूमीवर मूल्यशोध घेण्यासाठी प्रेरित होते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta book review prafull shiledar
First published on: 10-09-2017 at 01:12 IST