नुकत्याच दिवंगत झालेल्या ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं व्यक्तिमत्त्व साधं, स्नेहाद्र्र, काव्यमय होतं. त्यांच्या लेखनातूनही ते प्रतिबिंबित होत असे. त्यांच्या निकटतम सुहृद व  कवयित्री प्रभा गणोरकर यांनी रेखाटलेलं त्यांचं शब्दचित्र..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरीष पै हे नाव मी प्रथम ऐकले ते निर्मला देशपांडेकडून. १९६३-६४ च्या दरम्यान निर्मलाच्या यजमानांचा मुक्काम नागपूरला होता. त्यावेळी ती मधूनमधून नागपूरला चक्कर टाकायची. तेवढय़ातच पुसदला विदर्भ साहित्य संघाचे संमेलन झाले. त्यावेळी अण्णासाहेब खापर्डे, सुरेश भट, मधुकर केचे अशा दिग्गज कवींच्या गावातली मी लिंबूटिंबू कवयित्री असल्याने, बहुधा केंच्यांच्या शिफारसीमुळे असेल कदाचित, मला कविसंमेलनात भाग घेण्याची संधी मिळाली. ‘आज फोफावली भांग, कुठे दिसेना तुळस’ ही कविता मी तेव्हा वाचल्याचे आठवते. पण त्याहून आठवते ती धबधब्यासारख्या केसांचा ऐटदार अंबाडा घातलेली निर्मला आणि तिचे सारखे शिरीषविषयीचे बोलणे. केच्यांनी संमेलनात माझी निर्मलाशी ओळख करून दिली. केचे सर्वसंचारी. त्यांची शिरीषची चांगली ओळख होती. केच्यांचे मुक्ताशी लग्न झाले तेव्हा शिरीषने ‘हंसे मुक्ता नेली, मग केला कलकलाट काकांनी’ ही मोरोपंतांची आर्या त्यांना पत्रात कळवली होती. ‘बाळ म्हणाले आई, मी गंगेत बुडाले’ ही शिरीषची एक ओळ केच्यांनी आपल्या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेत लिहिली होती.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on shirish pai
First published on: 10-09-2017 at 01:53 IST