डावपेचांच्या पातळीवर आजचे सरकार जुन्या सरकारपेक्षा खूपच जास्त सक्षम आणि यशस्वी आहे. या सरकारने सबळ राहण्याचे आश्वासन दिले, पाळले आणि त्याची जबरदस्त जाहिरात केली. या ताकद दाखविण्यात लोकशाही, स्वायत्त संस्था वगैरेंची तुडवणूकही केली. त्यासाठी दिवाणखानी चर्चामध्ये लोकशाही आता निर्थक ठरते आहे व तिला तिलांजली देणे गैर नाही, असेही मांडले जाऊ लागले आहे. यात ‘स्वातंत्र्य’ या मूल्याबाबतची तुच्छता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजर्षी शाहूमहाराज गौरवग्रंथात नोंदलेली एक घटना अशी : दरबारातल्या चर्चेत एका गृहस्थांचे मत महाराजांच्या मतावेगळे होते. हे गृहस्थ मत बदलायलाही तयार नव्हते. आपल्या रोखठोक स्वभावाप्रमाणे महाराजांनी त्यांना फटकारले. दरबार संपताच हे गृहस्थ घरी गेले व त्यांनी कुटुंबीयांस आवराआवर करा, असे सांगितले. कारण संस्थानात राहून राजाशी वाकडे घेणे शक्य नव्हते. पण तेवढय़ात महाराजांकडून एकजण आला आणि म्हणाला, ‘‘महाराज म्हणाले, तुम्ही जायच्या तयारीत असाल. ते म्हणाले, जाऊ नका! म्हणाले, आम्हाला विरोध करणारे दरबारात हवेत.’’ ही कहाणी दहाएक वर्षांपूर्वी ‘आजचा सुधारक’ने उद्धृत केली होती. परंतु आता नेमका संदर्भ हाताशी नाही.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanda khare article on democracy in india
First published on: 21-05-2017 at 05:25 IST