जगाच्या समस्या सोडवण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार देणाऱ्या असामान्यांच्या कार्याची ओळख करून देणारे ‘विवेकीयांची संगती’ हे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर लिखित पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विसाव्या शतकात ‘जग सुंदर करण्याचे कार्य भांडवलशाही करेल की साम्यवाद?’ यावर जगाची विभागणीच झाली होती. त्यावेळी- ‘या दोन्ही विचारसरणींना जगाच्या समस्या सोडवता येणार नाहीत. किंबहुना, हे काम राजकारणाचे नाहीच’ असा अफलातून नावीन्यपूर्ण विचार (लॅटरल थिंकिंग) मांडणारे काही अवलिया होते. रिचर्ड बकमिन्स्टर फुलर हे त्यांमध्ये अग्रभागी होते. संपूर्ण विश्व हेच त्यांच्या विचारांच्या केंद्रभागी होते. ते स्पष्टपणे सांगत, ‘राष्ट्रवाद व राष्ट्र-राज्य (नेशन स्टेट) हे भग्नावशेष असून त्या संकल्पना काळानुरूप कालबा करणे आवश्यक आहे. मानवजात ही आजवर कधीही आले नाही अशा भयावह संकटाकडे वाटचाल करीत आहे. हे संकट पर्यावरण, पाणी वा ऊर्जेचे नसून अज्ञान हेच संकट आहे.’ फुलर यांचा वसा ‘पर्यावरणाला अथवा मानवाला इजा न करता, संपूर्ण जगाने संपूर्ण मानवजातीसाठी सहकार्याने कार्य करणे आवश्यक आहे’ हा होता.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta book review
First published on: 19-05-2019 at 00:09 IST