राम खांडेकर ram.k.khandekar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरसिंह रावांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आर्थिक सुधारणा म्हणजे ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ अशा नव्हत्या. या सुधारणा आर्थिक, सामाजिक आणि तात्त्विक भूमिकेतून दूरगामी परिणाम घडवणाऱ्या होत्या. नरसिंह रावांचा काही सिद्धांतांवर विश्वास होता. जसे- केवळ पडझड रोखण्यासाठीच बाजारावर सरकारी नियंत्रण असावे. तसेच सरकारच्या क्षमतेत वाढ करणे गरजेचे होते. अनावश्यक वस्तूंची आयात बंद करून परकीय चलनाचा उपयोग फक्त गरजेच्या वस्तूंसाठीच करण्याचे धोरण त्यांनी अमलात आणले. स्थानिक उद्योगांना किंचितही धक्का लागेल असे कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या कष्टाचे परिणाम अवघ्या २८ महिन्यांतच देशासमोर आले. या २८ महिन्यांच्या कालावधीत नरसिंह रावांनी एकदाही आधीच्या सरकारच्या ‘कर्तृत्वा’चा उल्लेख करून जबाबदारी झटकली नाही.

मराठीतील सर्व सत्तेच्या पडछायेत.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author ram khandekar article on pv narasimha rao economic reforms
First published on: 25-11-2018 at 00:06 IST