राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्यावर व मंत्री मधुकर पिचड यांच्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व निखालस खोटे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना गेली नऊ वष्रे प्रदेशाध्यक्ष व मंत्री करून भरभरून दिले, तरीही राजकीय स्वार्थीपणामुळे त्यांची परिस्थिती नाचता येईना अंगण वाकडे, अशी झाली असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.  ते म्हणाले, पक्ष सोडल्यानंतर त्यांना इतर पक्षात जायचे असेल तर त्यांनी सन्मानाने जावे. उगाच पक्षाची व आमची प्रतिमा मलीन होईल, असे धादांत खोटे आरोप करू नयेत.
पाचपुतेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
बबनराव पाचपुते कृतघ्न व खोटारडे-पिचड