• केंद्राकडून ८ हजार ५०० टन डाळींची निर्यात
  • डाळींच्या खरेदीमुळे भारतात ५१ हजार टन डाळींचा साठा.
  • खरीप हंगामात ठरविण्यात आलेले लक्ष्य आयातीमुळे पूर्ण.
  • डाळी अत्यावश्यक असल्याने ही आयात करण्यात आली असून आयात लवकरच भारतात पोहोचेल.
  • मसूर, हरभरा डाळ आणि इतरही काही डाळींचा आयातीत समावेश आहे.

अवकाळी पावसाचा गहू, फळे उत्पादनावर परिणाम

  • गेल्या आठवडय़ात देशातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे गहु, फळे आणि पालेभाज्या उत्पादकांना फटका बसला आहे.
  • वेधशाळेने पुढील आठवडय़ात पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांपुढील आव्हान वाढले आहे.
  • गेल्या दोन वर्षांत मान्सूनने दडी मारल्यानंतर वर्षांअखेरीस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामाला फटका बसला होता.
  • हवामान विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.