केंद्राकडून ८ हजार ५०० टन डाळींची निर्यात डाळींच्या खरेदीमुळे भारतात ५१ हजार टन डाळींचा साठा. खरीप हंगामात ठरविण्यात आलेले लक्ष्य आयातीमुळे पूर्ण. डाळी अत्यावश्यक असल्याने ही आयात करण्यात आली असून आयात लवकरच भारतात पोहोचेल. मसूर, हरभरा डाळ आणि इतरही काही डाळींचा आयातीत समावेश आहे. अवकाळी पावसाचा गहू, फळे उत्पादनावर परिणाम गेल्या आठवडय़ात देशातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे गहु, फळे आणि पालेभाज्या उत्पादकांना फटका बसला आहे. वेधशाळेने पुढील आठवडय़ात पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांपुढील आव्हान वाढले आहे. गेल्या दोन वर्षांत मान्सूनने दडी मारल्यानंतर वर्षांअखेरीस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामाला फटका बसला होता. हवामान विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.