* आसाममधील कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाबार्डकडून ७३१.२३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.
* या निधीतील ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरली जाणार आहे.
* ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाबार्डकडून ६०२.३६ कोटी रुपये तर राज्य सरकारकडून ३९४.६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
* ग्रामीण विकास निधी अंतर्गत आसामसाठी मंजूर करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे, असे नाबार्डचे व्यवस्थापकीय प्रमुख एस. नटराजन यांनी सांगितले.
* नाबार्डकडून स्थानिक कृषी विकासासाठी सहकारी आणि ग्रामीण बँकांना ६५.९४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
* या बँका १७ जिल्ह्य़ांतील कृषीविकास आणि वराहपालनावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारळ आणि खोबऱ्याचे भाव स्थिर
* तमिळनाडू कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना नारळ विक्रीचा सल्ला दिल्यामुळे बाजारात नारळ आणि खोबऱ्याचे भाव स्थिर राहिले आहेत.
* केरळ आणि तमिळनाडूत नारळाचे उत्पादन बऱ्यापैकी झालेले आहे. मात्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये उत्पादन तुलनेने घटले आहे.
* गतवर्षांच्या तुलनेत यंदा इतर राज्यांतून खोबऱ्याची आवकही कमी झाली आहे. खोबऱ्याची जूनपर्यंत ५२ ते ५४ रुपये किलो किंमत राहील असा विद्यापीठाचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 731 crore funds from nabard to assam
First published on: 05-05-2016 at 03:00 IST