या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • भारतातील चहा उत्पादनात १४.७ टक्के घट झाली आहे. एप्रिलपर्यंत देशातील चहा उत्पादन ६७.२१ दशलक्ष किलो झाले आहे.
  • मोठय़ा प्रमाणात झालेल्या पावसामुळे चहा उत्पादनात घट झाल्याचे आसाममधील चहा मंडळाने सांगितले आहे.
  • आसाममधील चहा उत्पादनात ११.३ टक्के घट झाली आहे. ती घट ३१.१६ दशलक्ष किलो इतकी आहे.
  • भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. भारताकडून करण्यात येणाऱ्या चहा निर्यातीतही २.२ टक्के इतकी घट झाली आहे.
  • भारताने नुकतीच २३० दशलक्ष किलो चहा निर्यात करून ऐतिहासिक कामगिरी केली असली तरी चहा उत्पादनात झालेली घट चिंता वाढविणारी आहे.

मत्स्यक्रांतीला केंद्र सरकार चालना देणार

  • मासे आणि माश्याच्या विविध उत्पादनांची निर्यात पुढील पाच वर्षांत १ लाख कोटीपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मत्स्यक्रांतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. २०१४-१५ या वर्षांत मासे आणि संबंधित उत्पादनांद्वारे भारताने ३३ हजार ४४१ कोटी रुपये मिळविले.
  • कृषी मंत्रालय पुढील महिन्यात मत्स्यशेतीसाठी नवे धोरण जाहीर करणार असून त्यात ‘अम्ब्रेला’ योजनेचा समावेश करण्यात येणार आहे. मत्स्यउत्पादन वाढविण्यासाठी खासगी क्षेत्रालाही सामावून घेण्यात येणार आहे.
  • गोडय़ा पाण्यातील मासेमारी आणि सागरी मासेमारी यांचा विकास करण्यासाठी हे धोरण उपयुक्त ठरणार असून त्यासाठी राष्ट्रीय मासेमारी विकास मंडळाचीही मदत घेतली जाणार आहे.
मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta farming news
First published on: 23-06-2016 at 05:15 IST