• गोव्यात मुसळधार पावसामुळे भाताच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.
  • पावसामुळे जमिनी पाण्याखाली गेल्या असून त्याचा परिणाम भातशेतीवर होणार असल्याचे राज्य कृषी विभागाने सांगितले आहे.
  • पुढील दोन दिवसांत पाऊस ओसरला तरच भातशेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अन्यथा मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागणार असल्याचे राज्य कृषी विभागाचे संचालक उल्हास काकोडे यांनी सांगितले.
  • गोव्यात मोसमी पावसाच्या कालावधीत सुमारे २८ हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते.
  • गोव्यातील ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात भातशेती केली जाते.
  • हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे सांगितले आहे. तसेच या पावसामुळे पाऊस झाल्यास पुराचा धोका निर्माण होईल, असे सांगितले आहे.
  • तसेच पीक विमा योजनेत विविध बँका, विमा कंपन्या, सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीबाबतही तपासणी करण्यात येणार आहे.

कॅगपीक विमा योजनेची तपासणी करणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • नियंत्रक महालेखापरिक्षक (कॅग) नऊ राज्यांतील पिक विमा योजनेची तपासणी करणार आहे. पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा कितपत लाभ हे ‘कॅग’कडून तपासण्यात येणार आहे.
  • कृषी साहाय्यक विभाग, कृषी विमा संस्था आणि राज्य कृषी हे विभाग महालेखापरिक्षकांना मदत करणार आहेत.
  • महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तेलंगण या नऊ राज्यांत विमा योजनेची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेने दिली आहे.
मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta farming news
First published on: 07-07-2016 at 05:40 IST