सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत मिळतात. जिल्ह्यात अशा विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७४ हजार १६ असून, पुस्तकांची मागणी ९ लाख ९६ हजार ८४९ आहे. पहिल्या टप्यात ६ लाख ३ हजार ९०७ पुस्तके जि. प. शिक्षण विभागाला प्राप्त झाली. मुख्याध्यापकांना पुस्तक वाटप करण्याची प्रक्रिया चालू आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने जि. प. व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. जिल्ह्यात जि. प. च्या १ हजार २०४, तर ८६८ खासगी अनुदानित शाळा आहेत. जि. प. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार १६ विद्यार्थ्यांसाठी ९ लाख ९६ हजार ८४९ पुस्तकांची मागणी केली. पहिल्या टप्यात ६ लाख ३ हजार ९०७ पुस्तके प्राप्त झाली. जिल्हा शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांमध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, गणित व इंग्रजी, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास व विज्ञान, सहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, इतिहास, विज्ञान, भूगोल, नागरिक शास्त्र, सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान, आठवीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे पुस्तकमिळणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विद्यालयातून मंगळवारी ११ केंद्रीय मुख्याध्यापकांना पुस्तकांचे वितरण केल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.दृष्टिक्षेपात संख्यातालुकानिहाय विद्यार्थीसंख्या, मागणी केलेली व प्राप्त पुस्तके : िहगोली ३८ हजार ३६० विद्यार्थी, २ लाख २१ हजार १५७ व १ लाख २१ हजार ५३८. सेनगाव २९ हजार ५८४, १ लाख ६६ हजार ७३३ व १ लाख २१ हजार ६८४. वसमत ४३ हजार ८४०, २ लाख ५० हजार ८२७ व १ लाख २१ हजार ५८६. कळमनुरी ३४ हजार ९८४, १ लाख ९९ हजार २७० व १ लाख २३ हजार २७२. औंढा नागनाथ २७ हजार २४८, १ लाख ५८ हजार ८६२ व १ लाख १५ हजार ८२७. पहिल्या टप्यात एकूण ६ लाख ३ हजार ९०७ पुस्तके प्राप्त.