मुंबई : जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने मराठवाडय़ातील अनेक तहानलेल्या गावांसाठी गोदावरी खोऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुराने कहर केला असतानाही काही भागांत पाऊस नसल्याने  टँकर्स सुरू आहेत, अशी माहिती  अधिकाऱ्यांनी दिली.

नाशिक परिसरात अतिवृष्टी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तेथील धरणांमधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरण  ९० टक्के भरले आहे. मराठवाडय़ात फारसा पाऊस नसताना जायकवाडीत एवढा मोठा पाणीसाठा झाल्याचा फायदा तेथील जनतेला होणार आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी खोऱ्यात पाणी सोडल्यास त्याचा फायदा शेकडो गावांना होईल. त्यामुळे हे पाणी सोडण्याची विनंती जलसंधारण मंत्री बबनराव लोणीकर व काही आमदारांनी केली. तेव्हा किमान एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई