दागिने किंवा पर्स चोरी करणाऱ्या महिलांच्या चोरीला पोलिसांनी अटक केली आहे. स्नेहा मसणजोगी, पूजा मसणजोगी आणि अर्चना मसणजोगी अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील महिलांची नावे आहेत. या सगळ्या महिला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी आहेत अशी माहिती मिळते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , जयश्री शिंदे या शहरातील देवानगरी सोसायटी येथून रिक्षाने जात असताना या आरोपी महिलांनी त्यांच्या बॅगेतून दागिन्यांची चोरी केली होती. त्याबाबत जवाहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत या तिन्ही महिलांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख १६ हजार ५०० रुपयांचे दागिने जप्त केले. या टोळीकडून आणखी गुन्हेही उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जवाहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव पुढील तपास करत आहेत.